बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेली सार्वजनिक रेल्वे वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला 2 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत 8 हजार 501 तिकीटे आरक्षित करण्यात आली आहेत. त्याद्वारे 14 हजार 600 प्रवासी प्रवास करणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
कोरोना कालावधीतही देशभरात 200 विशेष रेल्वेगाडया धावत आहेत. यातील मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात जाणार्या 16 व येणार्या 16 गाडयांचा समावेश आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी या विशेष गाडयांनाच महाराष्ट्रातील स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. याच गाडयांतून प्रवास होणार असून नियमित गाडया मात्र सुरू के लेल्या नाहीत. प्रवाशांना या गाडयांचे 120 दिवस आगाऊ आरक्षण करता येणार आहे. त्यानुसार 8 हजार 501 तिकीटे आरक्षित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.