बहुजननामा ऑनलाईन – भारताची बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या अपहरणाचे पत्र तामिळनाडूच्या जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आहे. हे अपहरण पैशांसाठी नाही तर लग्नासाठी केले जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. मलाईस्वामी अस अपहरकर्त्या व्यक्तीच नाव असून ही व्यक्ती ७० वर्षांची आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील रामनाथपूरमचे जिल्हाधिकारी नेहमी प्रमाणे आठवड्याची बैठक घेत होते. या बैठकीत नागरिक त्यांच्या समस्या किंवा सरकारी योजनासंदर्भातील अर्ज घेऊन येतात. यात अर्जांमध्ये एक अर्ज पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना धक्काच बसला. सत्तर वर्षाचे मलाईस्वामी यांनी २४ वर्षीय पी.व्ही.सिंधूशी लग्न करण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज फक्त विनंती म्हणून नाही तर, जर सिंधूसोबतच्या लग्नासाठी आवश्यकत्या गोष्टींची तयारी नाही तर तिचे अपहरण करण्याची धमकीही या अर्जाद्वारे त्यानी केली आहे.
इतकच नाही तर अर्जकरणाऱ्याने स्वत:चे वय १६ असून त्याचा जन्म ४ एप्रिल २०१६ रोजी झाला असल्याचे सांगितले आहे. सिंधूपासून आपण प्रचंड प्रभावित झालो असून तिला आयुष्याचा जोडीदार करण्याची इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी काय केले याची माहिती मिळाली नाही. पण चक्क नातवाच्या वयाच्या मुलीशी लग्न करण्याचा अर्ज करून मलाईस्वामी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.