कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ६९ गावठी बाँब जप्त केले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बाँब निर्मितीचे साहित्य जप्त केले. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघे घरातच बाँब तयार करीत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली. विलास जाधव आणि आनंदा जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिळलेली माहिती अशी की, आरोपी विलास जाधव आणि आनंदा जाधव या दोघा संशयितयांच्या घरातून 69 गावठी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य,असा सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उजळाईवाडी उड्डाण पुलाखाली शुक्रवारी (ता. १८) रात्री स्फोट झाला. या स्फोटात ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला. ऐन निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. बाँबशोध व नाशक पथक आणि एसआयटीमार्फत या घटनेचा तपास सुरू होता. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख व अपर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकासह, स्थानिक गुन्हे अन्वेषण, बॉम्ब शोधक व नाशक पथक करत होते.
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथील एका घरात छापा टाकला. तेथून संशयित विलास जाधव व आनंदा जाधवला ताब्यात घेतले. यात त्या दोघांनी घरातच हे बाँब तयार करत असल्याचे सांगितले. त्यासाठी ते सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे आदींचा वापर करत होते. हे बाँब शिकारीसाठी वापरले जातात. त्याला प्राण्यांच्या रक्ताचे आवरण लावून त्याआधारे रानडुकराची शिकार केली जात असल्याची कबुलीही दोघांनी दिली. विलास आणि आनंदा यांनी या पूर्वी अशा प्रकारचे बॉम्ब तयार केले आहेत काय, त्याची विक्री कोणा कोणास केली याची कसून चौकशी पोलीस करत आहेत.
Visit : bahujannama.com