मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमध्ये मंदिराची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साहात सुरू असताना या उत्सवाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना मंदिराची भिंत कोसळल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण जखमी झाले आहेत.
West Bengal: 4 dead & 27 injured after a wall of a temple, where people were gathering to celebrate #Janmastami, collapsed in Kachua, North 24 Pargana, earlier today. pic.twitter.com/L31UrWoEa2
— ANI (@ANI) August 23, 2019
सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कचुआ येथे लोकनाथ मंदिरात जन्माष्टमी उत्सवानिमित्त भाविक जमले होते. त्यादरम्यान मंदिराची जीर्ण भिंत कोसळून पडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अनेक भाविक त्या भिंती खाली अडकले. या घटनेनंतर पोलिसानी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने ढिगाऱ्यात दफन झालेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची खात्री पटली आहे.
West Bengal CM Mamata Banerjee has announced a compensation of Rs. 5 lakhs for the family of the deceased, Rs.1 lakh for those who got critically injured and Rs. 50,000 for others with minor injuries. https://t.co/95RZP5PNTf
— ANI (@ANI) August 23, 2019
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी असलेल्यांना ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.