बहुजननामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळं अनेक दिवस लॉकडाऊन होतं. गेल्या 7 महिन्यांपासून रेस्टॉरंट बंद आहेत. जर सरकारनं लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू केले नाही तर 35 ते 40 टक्के रेस्टॉरंट कायमची बंद होतील अशी भीती आहारनं व्यक्त केली आहे. राज्याील मंत्री आणि विविध पक्षांचे नेते यांची भेट घेऊन लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू करावीत अशी मागणी आहारच्या शिष्टमंडळानं केली आहे.
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, “रेस्टॉरंटमुळं प्रत्यक्ष 60 लाख लोकांना रोजगार मिळतो. तर अप्रत्यक्षपणे 2 कोटी लोकांना रोजगार मिळतो. कोरोना काळात रेस्टॉरंट क्षेत्रानं कर्मचाऱ्यांची जेवण आणि राहण्याची सोय केली. 7 महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही. त्यामुळं व्यवसाय वाचवणं कठिण झालं आहे. परंतु परवाना मिळवण्यासाठी 8 लाख रुपये द्यावे लागतात. सरकारनं तातडीनं पावलं टाकत या क्षेत्राला दिलासा द्यावा नाही तर 35 ते 40 टक्के रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद होतील. तसेच वाढलेल्या भाड्यामुळं 60 टक्के रेस्टॉरंट बंद होतील. आता आम्ही कठिण काळातून जात आहोत.”
या क्षेत्राला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. याबाबत राज्य सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेते यांची भेट घेतली. लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू करावीत अशी मागणी केली. राज्य सरकार तातडीनं पावलं टाकेल अशी अपेक्षा आहे आसंही ते म्हणाले आहेत.