औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीसोबत आता बंजारा समाजाच्या ३० संघटनांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीत किमान ४० जागा बंजारा समाजाला वंचितकडून मिळाव्यात अशी अपेक्षा समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष राजपालसिंह व अ. भा. गोर बंजारा सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद राठोड यांनी दिली.
तर यानंतर गोर बंजारा समाजाचा सत्ता संपादन मेळावा २८ जूलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. ऑल इंडीया बंजारा सेवा संघ, राष्ट्रीय बंजारा टायगर, भारतीय बहुजन क्रांती दल, अ. भा. बंजारा सेना, राष्ट्रीय बंजारा परिषद, अ. भा. गोर बंजारा सेना, बहुजन समाजपरिवर्तन महासंघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, भारतीय भटके विमुक्त आदीवासी संघटन, महाराष्ट्र बंजारा सेवा संघ, विश्व गोरसेना, बंजारा इंटलेक्च्युअल फोरम, गोर बंजारा साहित्य परिषद, महाराष्ट्र मजूर संघटना, या सर्व संघटना आता वंचित बहुजन आघाडीशी संलग्न झाल्या आहेत.
एसटी सुचीमध्ये संपुर्ण गोर बंजारा समाजाचा समावेश झालेला नाही. क्रिमीलेयरची जाचक अटक अजूनही रद्द करण्यात आली नाही. एससी एसटीच्या धर्तीवर भटक्या प्रवर्गाला अद्यापही स्वतंत्र बजेट दिलेले नाही. तसेच वसंतराव नाईक महामंडळाला निधी दिलेला नाही. आश्रमशाळांना अद्ययावत केलेले नाही. म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत जात आहोत. असे राजपालसिंग, प्रल्हाद राठोड, चुनीलाल राठोड, डॉ. गजानन जाधव यांनी केले.