बहुजननामा ऑनलाईन – गुरमीत राम रहीम, आसाराम यांसारख्या बाबांच्या कारस्थानांचा पर्दाफाश झाल्यापासूनच अलीकडे अनेक बाबांचे गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात, माजी गृह राज्यमंत्री असलेले स्वामी चिन्मयानंद यांनी एका विद्यार्थिनीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची बातमी चर्चेत असतानाच आता दुसरीकडे वृंदावनमध्ये राहणारे स्वामी रितेश्वर महाराज यांच्यावर छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याचा आरोप आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील भूपदेवपूर पोलिस स्टेशन परिसरातील केरझर ग्रामपंचायतीच्या डोंगाढकेल गावातील तीन मुली १० सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. या मुलींच्या नातेवाईकांनी रितेश्वर महाराजांनी त्यांच्या मुलींचे ब्रेनवॉश करून वृंदावनच्या आश्रमात नेल्याचा आरोप केला आहे. मुलींच्या कुटुंबियांनी सांगितले की, बेपत्ता मुली रितेश्वर महाराजांच्या विचारांना प्रभावित झाल्या होत्या. त्या घरी काहीही न सांगता उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील आनंदधाम आश्रमात गेल्या आहेत.
मुलींनी त्यांच्या घरातून मोबाइल, पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तू घेतल्या नाहीत, तर व्हिडिओ बनवून फेसबुकवर अपलोड केला आहे आणि घरी येण्यास नकार देत आहेत. चार वर्षांपूर्वी रितेश्वर महाराज व्याख्यान देण्यासाठी त्यांच्या गावी डोंगाढकेल येथे आले होते आणि बरेच दिवस गावात राहून त्यांनी मुलीशी संवाद वाढविला. याच काळात तरुण मुलींनी गुरुजींसोबत गावात होणाऱ्या कृष्णा लीलातील गोपींची भूमिका साकारण्यास सुरवात केली. हळू हळू तिन्ही मुलींवर गुरुजींचा प्रभाव पडायला लागला, तीन मुलींमध्ये दोन बहिणी आहेत आणि तिसरी त्यांची मैत्रिण आहे. या तिघीही काहीही न सांगता १० सप्टेंबरपासून वृंदावन आश्रमात निघून गेल्या आहेत.
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली सज्ञान आहेत आणि स्वत: च्या इच्छेने त्यांनी घर सोडले आहे. तरीही कुटूंबाने भूपदेवपूर पोलिस ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासत मुलीं मथुरा येथे असल्याचे समजले आहे. त्या आधारे मथुरा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, रायगड पोलिसांनी एक पथक मथुरेला पाठविले आहे. जर मुली घरी जाण्यास तयार असतील तर त्यांना हे पथक घरी घेऊन जाणार आहे.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा