चंद्रपूर बहुजननामा ऑनलाईन – राज्यात सध्या पक्षांतरारे वारे जोरदार वाहू लागले आहे. अशावेळी विरोधी पक्षांतील नेत्यांना भाजप शिवसेनेकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे नेते बोलत आहेत. त्यातच मला शिवसेनेत येण्यासाठी एक दोन वेळा नाही तर मातोश्रीवरून २५ वेळा फोन आल्याचा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मला शिवसेनेत घेण्यासाठी मातोश्रीवरून वारंवार फोन येत आहेत. काही दिवसांपासून वांद्रे आणि वर्षावरून येणाऱ्या फोनची संख्या वाढली आहे. मला भेटायला बोलवत आहेत. एक विरोधी पक्षनेता भाजपात गेला म्हणून दुसरा विरोधी पक्ष नेता शिवसेनेत जाईल असं नाही. अशा दावा त्यांनी केला. तर वांद्रे येथून एक दोन नाही तर तब्बल २५ वेळा मला फोन आला. विरोधी पक्षनेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असल्याचं चित्र आहे. असं ते म्हणाले.
राज्यात सध्या सुरु असलेल्या पक्षांतरामुळे राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केला. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना जास्तीत जास्त आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप सेनेमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसते. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेनेची यावर काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे गरजेचे आहे.