नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी म्हटले की, आतापर्यंत 23 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारी नोकर्यांच्या भरतीसाठी मुलाखती बंद केल्या आहेत. कामगार मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार सिंह यांनी म्हटले की, 2016च्या नंतर केंद्र सरकारमध्ये ग्रुप-बी (विना-राजपत्रित) आणि ग्रुप-सीच्या पदांसाठीच्या मुलाखती बंद केल्या आहेत.
मुलाखती बंद करण्याची सूचना
मंत्र्यांनी म्हटले की, 2015 मध्ये स्वतंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखती बंद करण्याची सूचना केली होती आणि लेखी परीक्षेच्या आधारावर निवड करण्याबाबत विचार मांडले होते.
केंद्राच्या भरतीसाठी मुलाखती बंदची घोषणा
त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कामगार आणि प्रशिक्षण विभागाने एक व्यापक प्रक्रिया राबवली आणि तीन महिन्यांच्या आत एक जानेवारी 2016 पासून केंद्र सरकारमध्ये भरतीसाठी मुलाखती बंद करण्याच्या घोषणा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
महाराष्ट्र आणि गुजरातची तयारी
त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि गुजरातसारखी काही राज्य हा नियम लागू करण्यास तयार होती पण, काही राज्य मुलखती बंद करण्यास इच्छूक नव्हती आणि नोकर्यांसाठी मुलाखती त्यांना घ्यायच्या होत्या.
खुप समजावल्यानंतर मुलाखती बंद
सिंह यांनी यावर समाधान व्यक्त केले की, राज्य सरकारांना खुप समजावल्यानंतर आणि वारंवार आठवण करून दिल्यानंतर आज जम्मू-काश्मीर आणि लडाखसह भारतातील सर्व आठ केंद्र शासित प्रदेश आणि 28 राज्यांपैकी 23 मध्ये मुलाखती घेणे बंद आहे.