मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे. आज तब्बल 20 हजार 489 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आजची रुग्ण संख्या आजपर्यंतची सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
20,489 new #COVID19 positive cases, 10,801 discharges and 312 deaths reported in Maharashtra today. Total number of cases now at 8,83,862 including 6,36,574 discharges, 2,20,661 active cases and 26276 deaths: State Health Department
— ANI (@ANI) September 5, 2020
राज्यात गेल्या 24 तासात 312 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 276 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच दरम्यान राज्यात 10 हजार 801 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत 6 लाख 36 हजार 574 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 2 लाख 20 हजार 661 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 703 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 98 हजार 593 झाली आहे. तर अॅक्टीव रुग्ण संख्या 58 हजार 120 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकूण 6 हजार 990 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.31 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.