थेऊर : बहुजननामा ऑनलाइन – हवेली तालुक्यातील एकुण 54 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने यासाठी 1797 उमेदवारांनी नामनिर्देशन केले असून यात सर्वाधिक उमेदवार उरुळी कांचन (103) व त्या खालोखाल लोणी काळभोर (100) व थेऊर (99) उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
मागील वर्षी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर निवडणूक प्रक्रिया जाहिर झाल्यानंतर दि.30 डिसेंबर रोजी संपलेल्या कालावधीपर्यंत हवेलीतील 54 ग्रामपंचायतीसाठी एकुण 1797 अर्ज प्राप्त झाले आहेत.यामध्ये पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर (99) उरुळी कांचन (103) या मोठ्या ग्रामपंचायत सह कुंजीरवाडी(79), सोरतापवाडी(51), आळंदी म्हातोबा (47), थेऊर (97), तरडे(22), नायगाव(44), पेठ(29), प्रयागधाम9 अशा गावांचाही समावेश आहे.
सरपंच पदांचे आरक्षण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घेतले जाणार असल्याने प्रत्येकाने गट प्रमुखाला आपल्या पॅनेलची रचना करताना सर्व शक्यता डोळ्यासमोर ठेवून आखणी करावी लागत आहे.वार्ड आरक्षणानुसार उमेदवार उभे करुन त्यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी या नेत्यावर आहे.आपल्याच गटाचे वर्चस्व कायम ठेवण्याची धडपड प्रत्येक जण करताना दिसतो आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीतील सहकारी अचानक विरोधात उभे राहिल्याने गणिते जुळवताना कसरत करावी लागते. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर याला रंग चढणार आहे कोण कोण यात आपले कसब लावणार यावर निकाल अवलंबून असणार आहे.