मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील अनेक बड्या नेत्यांनी भाजप – शिवसेनेत प्रवेश केला. मात्र निवणुकीत भाजपच्या जगांत घट झाल्याने भाजपची हवा नाहीशी झाली आहे. त्यात आता जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करता न आल्याने भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वेध लागले असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात आता पक्षांतर करून गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ३० हून अधिक नेते भाजपमध्ये सामील झाले होते. यापैकी काहीच जणांना निवडणुकीत विजय मिळाला असून अनेक नेते पराभूत झाले आहे. दरम्यान पक्षात सामील करूनही पराभूत झाल्याने भाजपमधून या नेत्यांना फारस महत्त्व मिळत नसल्याचं या नेत्यांत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
अश्या वेळी जयंत पाटील यांनी भाजपचे जवळपास १५-२० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यात आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. त्यामुळे आता भाजपला गळती लागणार कि काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Visit : bahujannama.com