मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात केला जात असून अनेक मेसेज व्हायरल होतात. सध्या 140… या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला कॉल रिसीव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढली जाईल, असा मेसेज व्हायरल होतोय. मात्र, या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे.
जोपर्यंत बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड /डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सी.व्ही.व्ही./ पिन नंबर शेअर केले जात नाही, तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र सायबर तर्फे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की,
140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये (1/n)— Maharashtra Cyber (@MahaCyber1) July 11, 2020
जर कोणालाही 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून कॉल आला तर घाबरू नये/ पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिलेले असतात. परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून कॉल आल्यास आणि ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका. किंवा पिन नंबर/ ओटीपीची माहिती कोणालाही देऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
The era of ‘any publicity is good publicity’ is a passé. Any publicity creating panic amongst citizens and suggesting a threat to their security will be dealt with necessary severity. Hope the fake calls for promotions aren’t bothering you any longer, Mumbaikars #SoNotDone
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 10, 2020