कोल्हापूर :बहुजननामा ऑनलाईन – दहावीची परीक्षा अवघड गेली. हि भीती सतावत असताना दहावीचा निकाल अगदी २ दिवसावर येऊन ठेपला होता. त्यामुळे मी परीक्षेत नापास हॊतॊ कि काय, या भीतीने कोल्हपुरातील एका दहावीच्या विद्यार्थ्याने गुरुवारी निकालाच्या दोन दिवस आधीच गळफास घेऊन आत्महत्या केली. पण दहावीत तो पास झाला. आणि आयुष्यात मात्र फेल झाला. प्रणव जरग असे या मुलाचे नाव आहे. शहरातील आर. के नगरात राहणार हा मुलगा आहे.
इंग्रजी विषयात नापास होईल अशी भीती प्रणवला खूप दिवसापासून होती. त्याने ते त्याच्या कुटुंबियांना पण सांगितले होते. त्यांनी त्याला धीर दिला होता. मात्र नापास होण्याच्या भीतीने नौराश्य आल्यामुळे त्याने निकालाच्या आधीच आत्महत्या केली. ताे दहावीत ४८ टक्के मिळवून पास हि झाला. पण हा आनंद पाहायला मात्र तो जिवंत राहिला नाही. प्रणव देशभक्त रत्नापा कुंभार विद्यालयाचा विद्यार्थी होता. प्रणवचे वडील हे बांधकाम व्यवसाय करतात.
प्रणवला दहावीत ४८ टक्के पडले हे त्याच्या मित्रांनी प्रणवच्या कुटुंबियांना सांगितले. पण त्यांचा आनंद तर कधीच गगनात विलीन झाला होता. त्यामुळे प्रणव दहावीत पास झाला पण आयुष्यात मात्र फेल झाला. हि भावना त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.