बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहार निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. बिहारमधील अररिया येथील फारबसगंजमध्ये एका सभेला(100 MPs) संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
“काँग्रेसनं खोटं बोलून देशाला स्वप्न दाखवलं होतं. काँग्रेसचे नेते पहिले गरिबी हटवणार, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, वन रँक वन पेन्शन योजना सुरू करणार असं म्हणत होते. काँग्रेसनं अनेक गोष्टी सांगितल्या. पण एकही काम केलं नाही. आज काँग्रेसची परिस्थिती अशी आहे, की त्यांचे लोकसभा आणि (100 MPs)राज्यसभेत मिळूनही शंभर खासदार नाहीत. काही राज्यांमध्ये तर त्यांना खातंही उघडता आलेलं नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेस चौथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत आणि दुसऱ्यांच्या मदतीनं ते वाचण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे म्हणत त्यानीं काँग्रेसवर टीका केली.
ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी कोसीवरील पूल तुटला होता. त्यानंतर तो पुन्हा बनू शकला नाही. परंतु, आमच्या सरकारनं तो पूर्ण केला. यापूर्वी बिहारची ओळख वेगळ्या पद्धतीची होती. या ठिकाणी सत्तेत असलेल्या लोकांनी बिहारची परिस्थिती खराब केली होती,” असा आरोपही केला.
मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीची खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होतं. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,” असंही मोदी या वेळी म्हणाले.