अकोला : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकित सर्वात जास्त चर्चा वंचित बहुजन आघाडीची झाली त्यांच्या प्रयोगामुळे लोकसभेला काँग्रेसच्या जवळपास आठ ते दहा खासदारांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला ते एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नावे न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यातील १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढविण्याची तयारी दर्शविल्याचे संकेतही अॅड. आंबेडकर यांनी दिले.
येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती काय असेल कोणाशी युती-आघाडी करणार, यासंदर्भातील भूमिका ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आता ते युती करतात कि स्वबळावर लढतात हे चित्र काही दिवसातच स्पष्ट होईल.