भोपाळ : वृत्तसंस्था-हनुमान दलित होते असे खळबळजनक व्यक्तव्य उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारावेळी केले आहे.
देशात धर्म आणि जातीवादाचे राजकारण शिगेला पोहंचले आहे. आगामी निवडणुकांमध्ये मत मिळवण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष धर्माचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. याचदरम्यान काही पक्ष जाती धर्माचे राजकारण, तर कोणी राम मंदिराच्या मुद्या वरून राजकारन करत आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारावेळी हनुमान दलित होते असे खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. इतकेच नव्हे तर हनुमान हे भारतीय परंपरेतील एक लोकप्रिय देव आहेत. ते स्वतः वनवासी, तसेच निर्वासी, दलित, याचबरोबर वंचितही होते.
इतकेच नव्हे तर भारतीयद्विप समुदायाला उत्तरे पासून दक्षिणे पर्यंत तसेच पूर्वे पासून ते पश्चिमे पर्यंत सर्वांना एकत्र करून काम केले आहे. त्यामुळे हनुमान यांचा संकल्प असला पाहिजे. इतकेच नव्हचे तर भारतीय जनता पार्टी चें उमेदवार राम किशन यांच्या निवडणूक चिन्हा वर आपल्या सर्वांचा संकल्प बजरंगी संकल्प असला पाहिजे. म्हणजेचच बजरंग बली यांचा संकल्प असला पाहिजे. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, यापूर्वी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजस्थान येथे भाजपाच्या निवडणूक प्रचारावेळी माकराना येथे काँग्रेसवर निशाणा साधला होता. मुंबई मध्ये २००८ ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याला घेऊन काँग्रेस ने देशात दुभाजण्याचे राजकारण केले आहे. याचाच परिणाम म्हणून देशात आतंकवादीयांची संख्या वाढली. विशेष म्हणजे काँग्रेस ने आतंकवादीयांना बिर्याणी खाऊ घातली होती. आणि आता पहा आम्ही आतंकवाद्यांना गोळ्या खाऊ घालत आहोत. असेही ते म्हंटले.