सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – न्यू बुधवार पेठ येथे डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचा स्वीकार करून तो रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे समाजातील लोकांकडून वर्गणी च्या माध्यमातून पैसा गोळा करून बुद्ध विहार उभारण्यात आले आहे.
पूर्वी बागले वस्ती म्हणून ओळखल्या जाणारा भाग आज न्यू बुधवार पेठ म्हणून ओळखल्या जात आहे. त्या न्यू बुधवार पेठ मध्ये एकूण १४ चौक आहेत. प्रत्येक चौकात एक बुद्ध विहार आहे. विशेष म्हणजे एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ करीत असतांना दुसरीकडे त्याच डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचा स्वीकार करून तो रुजवण्याचा प्रयत्न न्यू बुधवार पेठ येथे करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर समाजातील लोकांकडून वर्गणी च्या माध्यमातून पैसा गोळा करून रमापती चौकात बुद्ध विहार उभारण्यात आले.
विशेष म्हणजे दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या ९०० विद्यार्थ्यांनी रिपब्लिकन युवक ऐक्य आंदोलन समितीची स्थापना केली होती. सोलापुरात त्याकाळी दादासाहेब गायकवाड गट व बी.सी. कांबळे गटाच्या दोन मिरवणुका निघत होत्या. ऐक्य आंदोलन समितीमधील बाबू सितासावंत, महादेव लोंढे, कामगार नेते अशोक जानराव, भालचंद्र गवळी, वसंत भालशंकर, जनार्दन शिंदे, प्रकाश शिवशरण आदींनी सक्रिय सहभाग घेऊन त्याकाळी निघणाºया दोन मिरवणुका एकत्र आणल्या. १९७८-७९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणात काढण्यात आली, ती आजतागायत कायम आहे.