हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – भाजप सरकार याना त्या कारणाने भारतीय संविधान बदलण्याची भाषा करीत आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान बदलणाऱ्याचे हात आम्ही कलम करू असे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी म्हंटले. तसेच, भीमसैनिकांनी संविधानाचा विरोध करणाऱ्या विरोधकांचा पराभव करण्यासाठीची लढाई लढण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
22 जानेवारी मंगळवार रोजी हिंगोली येथील गांधी चौक भागातील संविधान कॉर्नर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बहुजन कला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नामांतर रौप्य महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, सध्याचे सत्तेवर असलेले भाजपप्रणित सरकार हे भारतीय संविधान बदलून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे संविधानाचा विरोध करणाऱ्या विरोधकांचा पराभव करण्यासाठीची लढाई लढण्यासाठी सर्व भीमसैनिकांनी सज्ज व्हावे. असे आवाहन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले.
इतकेच नव्हे तर, आम्ही रस्त्यावरले भीमसैनिक आहोत सोळा वर्षे नामांतराची लढाई लढली त्यानंतर समाजपरिवर्तनासाठी लढलो आता सत्तेवर आलेले भाजपसरकार या ना त्या कारणाने भारतीय संविधान बदलण्याची भाषा करीत आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान बदलणाऱ्याचे हात आम्ही कलम करू असेही त्यांनी म्हंटले.
दरम्यान गणेश पडघन यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी बहुजन कला महासंघाचे संस्थापक अध्यक्ष एल आर तांबे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गोपाळराव आटोटे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राष्ट्रीय सरचिटणीस जेके नारायणे, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे, आदी उपस्थित होते.