बहुजननामा ऑनलाइन : ( ऋषिकेश करभाजन )
माझ्या सावू चा गं आज, असे जन्मदिन|
आज पोरीला या तुझ्या, वाटे अभिमान||
हाल अपेष्टा अपार, सोसल्या तू आई|
आम्ही मुलींनी करावी, कशी त्याची भरपाई?
३ जानेवारी, इ.स. १८३१ सातारा जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे पाटील असे त्यांच्या आई वडिलांचे नाव. त्यांचे वडील हे गावचे पाटील. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा तेरा वर्षीय ज्योतिराव गोऱ्हे यांच्या सोबत विवाह झाला. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते. दरम्यान त्यांना पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले. दरम्यान १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.१८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या
इतकेच नव्हे तर, सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. १८४७-१८४८ कर्च्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.
विशेष म्हणजे यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या. या शाळांमध्ये सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली. मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.
विशेष म्हणजे सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. इ.स. १८९० साली महात्मा फुले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इतकेच नव्हे तर पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. याचबरोबर इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातूनच १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईंची प्रकाशित झालेली पुस्तके.
काव्यफुले (काव्यसंग्रह
सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
सुबोध रत्नाकर
बावनकशी
सावित्रीबाईं फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तके.
Savitribai – Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
‘हाँ मैं सावित्रीबाई फुले’ (हिंदी), (प्रकाशक : अझीम प्रेमजी विद्यापीठ)
सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
Savitribai Phule (इंग्रजी, N. K. Ghorpde)
कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले (लेखिका डाॅ. किरण नागतोडे)
सावित्रीबाईचा संघर्ष (के.डी. खुर्द)
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (केतन भानारकर)
पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले (गौरी पाटील)
सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
जोतिकांता सावित्री (दा.स. गजघाटे)
सावित्रीबाई फुले (प्रा. झुंबरलाल कांबळे)
Shayera.Savitri Bai Phule (in urdu)Author Dr. Nasreen Ramzan Sayyed
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार)
सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
स्त्री महात्मा सावित्रीबाई फुले (नाना ढाकुलकर)
मी जोतीबांची सावित्री (नारायण अतिवाडकर)
सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
सावित्रीबाई फुले (प्रमिला मोडक)
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले (प्रेमा गोरे)
साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे). – चिनार प्रकाशन
सावित्रीबाई फुले चरित्र (बा.गं. पवार)
तेजाचा वारसा सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रा. मंगला गोखले)
क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले (डाॅ. मा.गो. माळी) – मॅजेस्टिक प्रकाशन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (डाॅ. मा.गो. माळी) – स्नेहवर्धन प्रकाशन
सावित्रीबाई फुले – श्रद्धा (लेखक : मोहम्मद शाकीर)
सावित्रीबाई फुले (लीला शाह)
ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
Savitribai Phule (इंग्रजी, विठ्ठलराय भट)
युगस्त्री : सावित्रीबाई फुले (विठ्ठल लांजेवार)
सावित्रीबाई जोतिबा फुले : जीवनकार्य (शांता रानडे)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
साध्वी सावित्रीबाई फुले (सविता कुलकर्णी) – भारतीय विचार साधना प्रकाशन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (सौ. सुधा पेठे)
‘व्हय मी सावित्रीबाई फुले’ (नाटक) (एकपात्री प्रयोगकर्ती आद्य अभिनेत्री :
सुषमा देशपांडे) (अन्य सादरकर्त्या – डॉ. वैशाली झगडे)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
“ज्ञान बिना सब कुछ खो जावे,
बुद्धि बिना हम पशु हो जावें,
अपना वक्त न करो बर्बाद,
जाओ, जाकर शिक्षा पाओ”