नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – १० टक्के आरक्षण देणाऱ्यांना जनता झोपवल्या शिवाय राहणार नाही तसेच मोदी सरकार हे पहिले सरकार आहे जे फसवायला निघाले होते आणि स्वतःच फसले असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आरक्षणाचा रचलेला गेम त्यांच्यावरच उलटल्या शिवाय राहणार नाही असे राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत केले आहे.
“भाजप शिवसेनेचे भांडण म्हणजे प्रियकर प्रियसीचे भांडण आहे. नवरा बायोकोचे भांडण असते तर घटस्फोट झाला असता. अमित शहा प्रियकर आणि उद्धव ठाकरे प्रियसी आहेत. अमित शहा या जुन्या प्रियकरा बरोबर पटत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी नवीन प्रियकर बनवले आहेत” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. २३ जानेवारीला नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजप सेना युतीवर बोलणी याच दौऱ्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीचा धागा पकडून प्रकाश आंबेडकरांनी हि बोचरी टीका केली आहे.
नोटबंदीचा डेबिट आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी करण्यात आली आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भटची नेहमीच मागत आले आहेत त्यामुळे भटजीचे हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देणार नाही. म्हणून या सरकारला सत्तेतून बाहेर फेका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. एमआयएम सोबत युती करून प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. मध्यतंरी काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या आघाडीत सामावून घेण्यासाठी तयार झाली होती परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या समोर काँग्रेसने अट टाकली कि, तुम्ही एमआयएमची साथ सोडा. त्यावर प्रकाश आंबेकरांनी ठाम नकार दिला. आता एमआयएम सोबत युती करून आंबेकर आगामी निवडणुका लढवणार आहेत.