सातारा : बहुजननामा ऑनलाईन-आरक्षण हे ५० टक्के झाले असल्याने मराठा आरक्षणाचा मार्ग बिकट होतो आहे परंतु सरकार मराठा आरक्षणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल असा मला विश्वास वाटतो. मराठा आरक्षणाला कायदेशीर अडथळा निर्माण झाल्यास आम्ही संसदेत कायदा करायला लावून सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायला लावू असे रामदास आठवले म्हणाले. सातारा येथे पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.
१ डिसेंबरला मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भात निर्णय घेतील परंतु ते आरक्षण न्यायालयात टिकणार नाही म्हणून संसदेत कायदा केल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही असे रामदास आठवले म्हणाले. तामिळनाडूच्या धर्तीवर हा मुख्यमंत्री आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु नवव्या परिशिष्ठात समावेश कसा केला जाणार प्रश्न बिकट आहे. असे एकंदर दिसते आहे.
एनडीएच्या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण बोलणार असून यावर कायमचा तोडगा काढण्याची मी मागणी करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीला भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत असे वाटते आहे. बाळासाहेबांचे आणि भाजपचे घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे शिवसेना भाजपच्या बरोबर राहील असे मला वाटते. लोकसभेच्या निवडणुकीला जर ते एकत्र लढले तर भाजप शिवसेना युतीला ४८ पैकी ४५ जागा मिळतील आणि जर शिवसेना स्वतंत्र लढली तर शिवसेनेला मोठे नुकसान भोगावे लागणार आहे. येत्या निवडणुकीत भाजपला ३०० जागा मिळणार असून एनडीएला ४०० जागा मिळणार आहेत असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
राम मंदिराची जागा आम्हालापण द्या
राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्याची गरज नाही कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल लक्षात घेऊन न्यायालयाने दिलेल्या जागी मंदिर बांधावे मशिदीसाठी दिलेल्या जागी मशीद बांधावी आणि राहिलेली जागा आम्हाला द्यावी त्या ठिकाणी आम्ही बौद्ध प्रार्थना स्थळ उभारू असे रामदास आठवले म्हणाले आहेत.
भाजपचे सरकार संविधान बदलणार हि विरोधकांनी उठवलेली अफवा असून संविधानाचे रक्षण करण्यासाठी मी आणि नरेंद्र मोदी खंबीर आहोत. राहुल गांधी आणि शरद पवारांनी संविधानाची काळजी करणे सोडून द्यावे असा टोला हि रामदास आठवले यांनी लगावला. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी रामदास आठवले साताऱ्यामध्ये आले होते.