हनुमानगड : राजस्थान वृत्तसंस्था – भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी काँग्रेसने समजुदारी आणि संवेदनशीलता दाखवली असती तर आज करतारपूर भारतात असले असते ते भारतापासून कधीही दूर होऊन पाकिस्तानात गेले नसते. करतारपूर साहिब कॉरिडॉर प्रश्नी मोदींनी आज शीख धर्मियांच्या धार्मिकभावाने वर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान गड येथील सभेत राष्ट्रीय मुद्द्याला हात घालून मोदींनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला आहे.
करतारपूरचे काय आहे धार्मिक महत्व
कर्तार साहब हे शीख धर्मियांचे पवित्र ठिकाण असून त्या ठिकाणी गुरुनानक देव यांनी आपल्या आयुष्यातील १८ वर्ष व्यतीत केली होती. म्हणून या ठिकाणी शीख धर्मीय हजेरी लावून येथील गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतात. भारत-पाकिस्तान सीमेच्या पार पाकिस्तानात चार किलोमीटर आत असलेल्या या ठिकाणी भारतीय आता जात नसून ते भारत सीमेवर गुरुदासपूर या ठिकाणीच या पवित्र धार्मिक स्थळाचे दर्शन घेतात.
याच ठिकाणी भारत सरकारच्या वतीने करतारपूर साहिब कॉरिडॉरचे भूमिपूजन २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते तेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत ”आमच्या देशात पठाणकोट आणि अमृतसर येथे दहशतवादी पाठवले तर याद राखा आम्ही पण पंजाबी आहोत सडेतोड उत्तर मिळेल” अशी चेतावणी त्यांनी दिली त्यांनी पाकिस्तानला दिली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी (२८ नोव्हेंबर ) करतारपूर येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शीख धर्मियांच्या धार्मिक स्थळावर येऊन करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभ कार्यक्रमाचा घाट घातला होता.
विशेष म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू या कर्यक्रमाला उपस्थित होते. सिद्धूंवर देशभर टीका होत असताना त्यांच्यावर भारतात एवढी टीका केली जाते आहे असा सवाल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करतारपूर येथील कार्यक्रम विचारला होता आता या सर्व प्रकरणावर मोदी यांनी आपले वक्तव्य केले आहे.
करतारपूर बद्दल काँग्रेसला आज का लगाव वाटत आहे . १९४७ साली काँग्रेसला करतारपूर का आठवले नाही जेव्हा ते पाकिस्तान मध्ये जात होते. तेथे आज आम्ही करतारपूर साहिब कॉरिडॉर उभारत आहोत याचे श्रेय मोदीला जात नाही तर तुम्ही दिलेल्या एका अनमोल मताला जाते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमूहाला उद्देशून म्हणाले आहेत.