नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था-मोदींनी माझ्यावर अन्याय करण्यास सुरुवात केली असून सीताराम केसरी यांच्या प्रमाणे मी हि दलितच आहे असे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी म्हणले आहेत. सीताराम केसरी यांच्या सारख्या दलित नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून उचलून फेकले होते कारण सोनिया गांधींना अध्यक्ष बनवायची घाई काँग्रेस पार्टीला झाली होती असा घणाघाती आरोप नरेंद्र मोदी यांनी छिंदवाडा येथील प्रचार सभेत बोलताना केला होता.
काँग्रेस पक्षाच्या राजकारणावर टीका करण्याचा सपाटा नरेंद्र मोदी यांनी सुरु केला आहे. चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूक सध्या सुरु असून त्या निवडणुकीत प्रचाराची राळ चांगलीच उडाली असून त्याच टीकेच्या निमित्ताने मोदींना घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. सीताराम केसरी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता कारण त्यांना सोनिया गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी पक्षातून राजीनाम्यासाठी दबाव टाकला होता. असा मोदींनी दावा केला होता त्यानंतर तारिक अन्वर यांनी आपण केसरी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम केले आहे.
केसरी यांनी आपल्या वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिला होता त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी बनल्या या दोन घटना योगायोगाने घडल्या असून मोदींनी याचा विपर्यास करणे सुरु केले असून यांच्या भूल थापांना लोकांनी फसू नये से ट्विट तारिक अन्वर यांनी केले होते. त्याच दिवशी, देशाचे पंतप्रधान अशिक्षित आहेत देशाला असला प्रतंप्रधान विकासाकडे नव्हे तर अधोगती कडे घेऊन जाईल. असे म्हणत सीताराम केसरी हे दलित नव्हते तर ते ओबीसी होते मोदींच्या विस्मृतीत आहे. मोदींच्या जाहीर सभेनंतर ट्विटर वर त्यांच्या सभे नंतर लगेचच ट्विटर युद्ध रंगात आले आहे.
दरम्यान याच विषयाचा धागा पकडून यशवंत सिन्हा यांनी मोदींवर आज पुन्हा एकदा टीका करणारे ट्विट केले आहे. ओबीसी समाजाला मोदी दलित समजत आहेत म्हणून त्यांच्या दृष्ठीने मीही दलित आहे असे यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. म्हणूनच मोदी माझ्यावर अन्याय करत आहेत असे त्या ट्विट मध्ये सिन्हा म्हणाले आहेत. यशवंत सिन्हा यांना भाजपच्या पहिल्या फळीतून वगळण्यात आले असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पासून ते बॅकफूटला गेले आहेत. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु पक्षाने ती इच्छा धुडकावून लावली. एकंदरच यशवंत सिन्हा यांच्या राजकारणाचे दही उन्हात घालण्याची योजना मोदींनी आखली आहे.