बीड: बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा एस टी अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्या कँबिनेट मध्ये मार्गी लावू असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुंख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बारामती येथिल उपोषण करणाऱ्या समाज बांधवाना दिले होते परंतू गेली चार वर्षे उलटून गेली परंतू धनगर समाजाचा भ्रम निराश या भारतीय जनता पार्टी सरकारने केली आहे त्यामुळे धनगर समाजाच्या एस टी अनुसूचित जमातीचा आरक्षण प्रश्न मार्गी लावला नाही तर 2019ला महाराष्ट्रातील एक कोटी वीस लाख धनगर समाज सरकार पाडून जल्लोस करणार आहे असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे धनगर समाज संघर्ष समिती नि बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की धनगर समाजाची भाजपाने ज्या पध्दतीने फसवणूक केली त्या पेक्षा जास्त धनगर समाजाची फसवणूक राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने केली आहे परंतू 1990 धनगर समाजाच्या मतामुळे भारतीय जनता पार्टीची सत्ता धनगर समाजामुळेच आली होती आणि 2014ला देखिल धनगर समाजाच्या मताच्या जोरावर महाराष्ट्रात व केंद्रात सत्ता आली पण भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेली आश्वासनाची वचनपुर्ती केली नाही तर महाराष्ट्रातील धनगर समाज 2019 सरकार पाडून जल्लोस करणार आहे. आणि यापुढे धनगर समाज ना राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत जाणार नाही ना भाजप सोबत जाणार नाही. तर आम्ही सत्ता काबिज करण्यासाठी धनगर समाज एकवटणार आहे असे देखिल वाकसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे.