नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – ना राहुल,ना मोदी, ना फडणवीस, ना ठाकरे, ना पवार, कुणीच या देशाला मजबूत बनवू शकत नाही. आम्ही झोपलेल्याना जागे करायला इथे आलो आहोत. या देशाला मजबूत करायचे असेल तर ते प्रकाश आंबेडकर करू शकतात ते ही दिल्ली ला जाऊन. असे एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवैसी यांनी म्हंटले आहे.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज ( १७ जानेवारी ) नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांची हि सयुंक्त सभा होती. दरम्यान आम्ही झोपलेल्यांना जागे करायला इथे आलो आहोत.या देशाला मजबूत करायचे असेल तर ते प्रकाश आंबेडकर करू शकतात ते ही दिल्ली ला जाऊन. आणि सर्व दलित एकत्रित आल्यावरच हे शक्य होऊ शकते.असे एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवैसी यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर ना राहुल,ना मोदी, ना फडणवीस, ना ठाकरे, ना पवार, कुणीच या देशाला मजबूत बनवू शकत नाही. हे फक्त तू तू मै मै करू शकतात अशी टीकाही त्यांनी सर्वच पक्ष श्रेष्टींवर केली आहे.
याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले म्हणून मिळाली आहे. नाहीतर त्यांना कुणीच माणूस म्हणले नसते. असेही ते म्हंटले.