खामगांव : बहुजननामा ऑनलाईन – आई वडिलांच्या दुर्लक्षा मुळे मुलं व्यसनाधीन होतात, त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बाल धम्म शिबिराची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका विशाखा सावंग यांनी केले आहे.
खामगांव येथील आंबेडकर नगर मधील विश्वरत्न बुद्ध विहार येथे संघरत्न महिला मंडळ तसेच सम्राट अशोका क्रीडा मंडळ आंबेडकर नगर हरीफैल यांच्या वतीने बाल बुद्ध धम्म संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शिबिराच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका विशाखा सावंग या होत्या. त्यावेळी बोलतांना मोबाईल आणि टीव्ही मुळे संवाद प्रक्रिया खंडित झाली आहे. त्यामुळे आई वडिलांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्यमुळे मुले व्यसनाधीन होत आहेत. हि निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बाल धम्म शाबीरांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव तायडे, जे. के. रंजीत , डॉ. अनिल वानखेडे, दादाराव हेलोडे, ज्योतीताई गवई, संजय गवई, प्रशांत दमदाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.