नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू अनंत काळापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही. संसदेत कायदा निर्माण करून अयोध्येत भव्य राम मंदिर बनविण्याचा मार्ग मोकळा करावा असे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हंटले आहे.
अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी हिंदू धर्मियांची इच्छा आहे. इतकेच नव्हे तर अयोध्येत राम मंदिर उभारणीबाबत हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने अध्यादेशाची मागणी करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत अध्यादेश काढण्यासंदर्भातील निर्णय केवळ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकतो, असे म्हंटले असता, पुन्हा एकदा अध्यादेश काढा, तसेच हिंदू अनंत काळापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही. संसदेत कायदा निर्माण करून अयोध्येत भव्य राम मंदिर बनविण्याचा मार्ग मोकळा करावा असे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, गेल्या कित्तेक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिर प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय तात्काळ सुनावणीची मागणीही स्वीकारत नाही. ४ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी आहे. मात्र आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाहीत. सरकारने संसदेत कायदा निर्माण करून अयोध्येत भव्य राम मंदिर बनविण्याचा मार्ग मोकळा करावा. असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर अयोध्येतील राम मंदिराबाबत ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त आयोजित धर्मसंसदेमध्ये या पुढील निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबरला रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी पंढरपुरातील विठुरायाला साकडेही घातले होते.