नागपूर : बहुजननामा ऑनलाईन- दलितांच्या मतावर काँग्रेसची सत्ता अवलंबून आहे. इतकेच नव्हे तर दलितांची मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
डॉ. ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवसा निमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान दलितांच्या मतावर काँग्रेसची सत्ता अवलंबून आहे. इतकेच नव्हे तर दलितांची मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर आपण मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करीत असल्याचा आरोप होतो. त्यात काहीच तथ्य नाही. दलित समाजाच्या भल्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. मी कुणाच्याही भूलथापांना बळी पडणारा माणूस नाही. समाजाच्या अधिकारांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे असेही ते म्हंटले.
याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व ज्योती लांजेवार यांचे साहित्य यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. थोरात यांनी दलित साहित्याचे महत्त्व समजावून सांगितले. दलित साहित्य भव्य असून त्याचा सर्वत्र विस्तार झाला आहे. आज सर्वच भाषांतील साहित्यावर दलित साहित्याचा प्रभाव दिसून येतो. या साहित्याने अदृश्य असणाऱ्या समाजाला दृश्य केले. ज्योती लांजेवार यांनीही आपल्या साहित्यातून दलित समाजाच्या वेदना बाहेर काढल्या.
इतकेच नव्हे तर ‘वादळ उठणार आहे’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी अध्यक्षस्थानी तर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.स. जोग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, रिपाईचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर व माजी आमदार अनिल गोंडाने आदी उपस्तिथ होते.