कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – गावागावातील देवदेवतांचे पावित्र्य टिकवण्याचे काम गुरव समाज करत आहे. या समाजातील तरुणांनी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करण्याची संधी खेचून आणून समाज विकासाची कामे करावीत, असे प्रतिपादन नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी केले. ते दुर्गमानवाड येथे गुरव समाज मेळाव्यात बोलत होते.
राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे जिल्ह्यातील गुरव समाज्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोफत आरोग्य शिबिर, समाजातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केल होते. बालरोगतज्ज्ञ सुहास पाटील, डॉ. उदय पाटील, डॉ. रोहन गुरव यांनी समाजातील गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुरव, प्रदीप गुरव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
मेळाव्यात तालुक्यातील गुरव समाजातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेल्या बांधवांचा गौरव संघटनेच्या वतीने करण्यात आला. गुरव समाजाच्या कालदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. मेळाव्यास सरपंच युवराज गुरव, गुरव समाज संपर्कप्रमुख तेजस्विनी गुरव, उपाध्यक्ष बंडोपंत गुरव, बी. टी. गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव, भगवान गुरव, महादेव गुरव, लहू गुरव, प्रदीप गुरव, सुभाष गुरव, रूपेश गुरव, प्रमिला गुरव, सुनीता गुरव, अलका पाटील, दुर्ग मनवाडचे तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी गुरव, नंदू गुरव, सुरेश गुरव, सुनील गुरव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.