देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवार ( ३० नोव्हेंबर ) दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले करण संत (वय ४५) हे देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र शनिवारी सकाळी पहाडगंज येथील आंबेडकर भवनातील तिसऱ्या मजल्यावरुन पडून करण संत यांचा मृत्यू झाला.
करण संत हे तिसऱ्या मजल्यावरुन खाली कसे पडले याचा अद्यापही समजू शकले नाहीये. मात्र या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे या या मोर्चात खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते. इतकेच नव्हे तर दरम्यान, संसद मार्गावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मोर्चानिमित्ताने सर्व विरोधकांनी ‘किसान मुक्ती मोर्चा’च्या व्यासपीठावर एकत्र येत मोदींविरोधात हल्लाबोल केला. मागण्या मान्य करा किंवा सत्ता सोडा, असा घोष करीत हजारो शेतकरी दिल्लीत धडकले होते. २१० शेतकरी संघटनांच्या ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’च्या सभेला राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल आदी नेते उपस्थित होते.