मुंबई : बहुजननामा ऑनलाईन-संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. २६ नोव्हेंबरपासून संविधान मार्चला सुरुवात होणार आहे.
पीपल्स रिपल्बिकन पार्टी तर्फे आज ( दि. २० नोव्हेंबर ) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची मागणी करत आहेत. यामुळे संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार असल्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे २६ नोव्हेंबरपासून संविधान मार्चची सुरवात होणार आहे. तर ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर हा मोर्चा धडक देणार आहे. असे पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर संविधान सन्मान लाँग मार्चमध्ये हजारो भीमसैनिक सामील होतील,असा दावाही त्यांनी केला. याचबरोबर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, रिपाइं (ए) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना संविधानाचा आदर असेल, तर त्यांनी या मार्चमध्ये सामील व्हावे, ”असे आवाहन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे.