नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसने सत्तेत असताना स्मारकासाठी इंदू मीलची एक इंचही जमीन दिली नाही. काँग्रेसला इंदू मिलची जमीन बळकवायची होती. असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटलो. यासाठी मीलच्या जागेची मागणी केली. त्यावेळी मोदींनी ३ दिवसात जमीन देण्याचे आश्वासन दिले, हे आश्वासन पाळलेही. असेही त्यांनी म्हंटले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशन कस्तुरचंद पार्कमध्ये आयोजित करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
शहरातील कस्तुरचंद पार्कमध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान काँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना संविधान सभेवर येऊ दिले नाही. आता तेच त्यांच्या नावावर मते मागत आहेत. नागपूरातुन समतेचा संदेश देणाऱ्या महामानवाचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. आम्ही काम केले आहे, काँग्रेसने फक्त घोषणाच दिल्या आहेत. काँग्रेस खोटे बोलून संभ्रम निर्माण करत आहे, आता त्यांचे दुकान बंद होणार आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.
आमचे काम संविधानाचे रक्षण करणे हे आहे. नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान असतील तोपर्यंत संविधान बदलले जाणार नाही. अनुसूचित जातीत गरिबी असल्याचे सर्वेक्षणात दिसले असून यावर पंतप्रधान मोदी काम करत आहेत. अनुसूचित जातीचे हीत लक्षात घेणारे हे केंद्रातील सरकार आहे. लंडन येथील घर विकत घेतले आहे हेहि केंद्र सरकारच्याच मदतीने. असेही ते म्हंटले.
इतकेच नव्हे तर, काँग्रेसने अनुसूचित जातीचा फक्त वापर केला आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबातील लोकांना सत्तेत बसवायचे आहे. पंतप्रधान मोदी हे गरिबीतून आलेले आहेत. त्यांना गरिबांचे दुःख माहित आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.