कल्याण : बहुजननामा ऑनलाइन – ईव्हीएम मशीनबाबत देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असताना, आगामी निवडणुका बॅलेट पेपरने घेतल्या, तरी आमचा पाठिंबा भाजपालाच असेल असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
इंग्लंडमध्ये एका हॅकरने पत्रकार परिषद घेत ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे, देशात पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच निवडणूक आयोगाने आज पुन्हा एकदा निवडणुका ईव्हीएमनेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान कल्याण येथील आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना यासंदर्भात विचारले असता, वेळेअभावी आगामी लोकसभा निवडणुका बॅलेटने घेणे शक्य नसले, तरी आगामी निवडणुका बॅलेटने घेतल्या तरी चालतील. इतकेच नव्हे तर, प्रियांका गांधी राजकारणात आल्याने काँग्रेसला काही फायदा होणार नाही आणि भाजपलाही काही तोटा होणार नाही असा दावाही त्यांनी केला.विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएम प्रकरणाशी जोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हंटले.