वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – अयोध्या आणि बाबरी जागेवर प्रथम बौद्धांचा अधिकार होता. कालांतराने हिंदू व नंतर मुस्लिमांचा ताबा झाला. असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंदी विश्वविद्यालयाने व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमा नंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान अयोध्या आणि बाबरी जागेवर प्रथम बौद्धांचा अधिकार होता. कालांतराने हिंदू व नंतर मुस्लिमांचा ताबा झाला. सध्या असलेल्या वादावर न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील धोरण ठरवावे. प्रकाश आंबेडकर व एमआयएम यांनी हातमिळवणी केली, पण त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेबांचे नातू असल्याने आम्ही त्यांचा सन्मानच करतो. ते जर आमच्या टीममध्ये आले तर त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास मी तयार आहे. असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे
याचबरोबर दलितांना आरक्षण मिळत असल्याने त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. आर्थिक परिस्थितीत कमकुवत असलेल्यांसाठी २५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. उच्चवर्णीयांना आरक्षण देऊन त्यांची उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत करावी. आरक्षणासाठी वारंवार होणाऱ्या आंदोलनांना तोंड देण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी कायदा व्हावा म्हणून मी प्रयत्नशील आहे.