पनवेल : बहुजननामा ऑनलाईन-अमृतसर येथील राजासांसी परिसरातील अादिवाल गावात निरंकारी मंडळाच्या भवनावर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी गाडीवर येऊन भवनाच्या गेट वर येऊन बॉम्ब टाकला आणि एकच खळबळ उडवू दिली. या हल्ल्यात तीन व्यक्ती ठार झाल्या असून दहा जण जखमी असल्याचे वृत्त आहे. तोंड झाकून आलेल्या युवकांनी निरंकारी भवनाच्या गेट वर गाडी थांबवली आणि आत बॉम्ब टाकला. घटना स्थळी बॉम्ब टाकल्या बरोबर धावपळ झाली त्या धावपळीत लोकांची चेंगराचेंगरी झाली असल्याचे वृत्त समोर येते आहे.
सद्गुरू निरंकारी बाबांचा दर बुधवारी आणि दर रविवारी सत्संग भरवण्याची परंपरा बऱ्याच वर्षांपासून पाळली जात आहे. नेहमी प्रमाने आज रविवारी सकाळी ११ वाजता भरलेल्या सत्संगावर सकाळी साडे अकराच्या सुमारास दोन तरुण मुले गाडीवरून आले त्यांनी काळ्या रंगाची कपडे घातली होती आणि त्यांनी गाडी निरंकारी भवनाच्या गेट समोर थांबवून गेटच्या आत एक पिशवी फेकली आणि काही क्षणातच बॉम्बचा मोठा धमाका झाला. हे एवढं जलद होत कि क्षणार्धात सर्व काही घडून गेले असे प्रत्यक्षदर्शनी व्यक्तींकडून सांगण्यात येते आहे.
पंजाबला दिला होता हायअलर्ट
पंजाब वर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती तर पंजाबच्या गुप्तवार्ता विभागाच्या वतीनेहि मागील काही दिवसापूर्वी फिरोजपूच्या सीमावर्ती भागातून चार दहशतवादी भारताच्या सीमेत आले असल्याची वार्ता देण्यात आली होती या वार्तेचा आजच्या हल्ल्याशी संदर्भ होता का हे तपासले जाणार आहे .
संपूर्ण पंजाब राज्यात केली नाकाबंदी
या हल्ल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच राज्याच्या गृह विभागाने सर्व राज्यात नाके बंदी केली असून त्या दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट लागू करण्यात आला आहे. येत्या काळात या प्रकरणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचं बोलले जात आहे.
या हल्ल्याचे ठिकाण भारत पाकिस्तान सरहद्दीला चिटकून असल्याने हा दहशतवादी हल्ला आहे का याबद्दल चाचपणी सुरु आहे. दोन दिवस अगोदरच अमृतसर शहराला देखील अर्लट देण्यात आला होता.