माळशिरस : बहुजननामा ऑनलाईन –हिवाळी अधिवेशात सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यातील धनगर समाज मुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरु देणार नाही. असा इशारा प्रा.दादासाहेब हुलगे यांनी सरकारला दिला आहे. प्रा.दादासाहेब हुलगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे.
धनगर आरक्षणाबाबत सरकारने वेळकाढूपणाचे धोरण अंवलंबले आहे. धनगर समाजाचा घटनेत 36 व्या क्रमांकांवर अनुसुचीत जमातीच्या यादीत समावेश आहे. त्यामुळे या समाजाच्या चालीरिती, रुढी-परंपरा, संस्कृती,
गेली चार वर्ष समाजाला सरकारने “टिसचे”गाजर दाखवून शांत ठेवले आहे. आता मात्र समाजाची मानसिकता संयमाची राहणार नाही. सरकार धनगर आरक्षणाबाबत एसटी-2 ची नवीन सूची करत आहेत. एसटी-1 मध्ये आदिवासी व तत्सम जमाती आणि एसटी-2 मध्ये धनगर समाजाचा समावेश अशी फसवी आणि केंद्र सरकारकडे धुळखात पडणारी शिफारस करणार आहेत. आपल्या शेजारील राज्य गोवा येथील गवळी धनगराबाबत तेथील सरकारने चार वेळा आरक्षणाबाबत केंद्राकडे शिफारस पाठवली मात्र ही शिफारस केंद्राकडे धुळखात पडली आहे. त्यामुळे समाजाला शिफारस नको तर आता अंमलबजावणी हवी आहे.
इतकेच नव्हे तर धनगर आरक्षणाबाबत सरकारचा चार वर्षात खुप अभ्यास झालेला आहे. त्यामुळे समाजाच्या संयमाचा अंत:न पाहता धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा. ज्या समाजाने आपल्याला खुर्चीत बसवले आहे त्या समाजाला “शिफारशीची” नुसती नौटंकी करण्यापेक्षा अंमलबजावणी करा.आता राज्यात व केंद्रात हिवाळी अधिवेशन चालू होत आहे. त्यामुळे या कार्यकाळात धनगर आरक्षण अंमलबजावणी होणार नसेल तर धनगर समाजाचा संयम सुटेल त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडेल त्यामुळे सरकारने हिवाळी अधिवेशात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यातील धनगर समाज राज्यातील मुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरु देणार नाही. त्यामुळे सरकारने हिवाळी अधिवेशात धनगर आरक्षण अंमलंबजावणीचा प्रश्न निकाली काढावा असा इशारा प्रा.दादासाहेब हुलगे यांनी सरकारला प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.