मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेससुद्धा आरएसएसप्रमाणे हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा पक्ष असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडी स्थापन करुन सर्व वंचित तळागाळातील लोकांना जातींना बरोबर घेऊन जाण्याचा अजेंडा प्रकाश आंबेडकरांनी राबवला आहे. धर्मनिरपेक्षवादी अजेंडा घेऊन काम करणारा पक्ष कसा हिंदुत्वादी तसेच भाजपचा भाऊ आहे हे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा तोंडावर आलेली असताना एकमेकावर कुरघोडी करताना आपणाला दोन्ही पक्ष प्रकर्षाने दिसतील. पक्ष दोन पण अजेंडा मात्र एकच आहे, पक्ष मतांसाठी हिंदुत्चाचा पुरेपूर वापर करताना आपणाला दिसतील. भाजप कट्टर हिंदुत्ववादी तर काँग्रेस हा सॉफ्ट हिंदुत्ववादी पक्ष आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर केली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात भाजपचं सरकार बनलं. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसंच ओवेसीचं नेतृत्त्व उभं राहिलं तर मुस्लिम मतदार दुरावतील, अशी भीती असल्यामुळेच काँग्रेस त्यांना विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.