बीड : बहुजननामा ऑनलाईन – यशवंत सेनेतर्फे सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनात धनगर आरक्षण देण्याची सुबुद्धी यावी या मागणीसाठी मेंढरांची आरती करुन भंडारा उधळला आहे. याचबरोबर “येळकोट येळकोट जय मल्हार’, ” बिरुबादेवाच्या नावाने चांगभलं ‘अश्या घोषणाही त्यावेळी देण्यात आल्या.
सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन होऊन चार वर्षे उलटून गेले तरी धनगर आरक्षण मिळाले नाही. यामुळे सरकारचा निषेध म्हणून यशवंत सेनेतर्फे आंदोलक महिला मेंढर असलेल्या ठिकाणी आरतीचे ताट घेऊन गेल्या दरम्यान हिलांनी मेंढरांची आरती केली त्यावेळी पुरुष आंदोलकांनी भंडारा उधळून यळकोट यळकोट जयमल्हार, बिरुदेवाच्या नावानं चांगभल अशा घोषणांचा गजर केला.
विशेष म्हणजे सरकार धनगर आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. टिस संस्थेने अहवाल देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. इतकेच नव्हे तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र सरकारने चार वर्षे या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. सरकारने अभ्यासाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाची केंद्राकडे शिफारस करुन पाठपुरावा करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी असे आंदोलकांनि म्हण्टलंकले आहे.
यावेळी भारत सोन्नर , रणजित खांडेकर, अशोक भावले, श्री. तागड, लकडे रामचंद, अशोक लकडे, माणिक लकडे, अरुण भावले, मीरा लकडे, केशर भावले, विमल लकडे आदी पदाधीकारी उपस्थित होते.