नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकता येणे शक्य नसते. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृती करून आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकला आहे. विशेष म्हणजे आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. इतकेच नव्हे तर आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी घेणारे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. असेही रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन चार वर्ष पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात तरुण, अभ्यासू, उत्साही, हसतमुख आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सतत नव्या निर्मितीची धडपड असणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनमानसावर आपली मुद्रा उमटवली आहे. इतकेच नव्हे तर फडणवीस सरकारची चार वर्षे ही महाराष्ट्राच्या शाश्वत प्रगतीचा पाया रचणारी ठरणार आहे. असेही ते म्हंटले आहेत.
याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे तसेच आरक्षणाचे, अॅट्रॉसिटी कायद्याचे आणि संविधानाचे रक्षण करणारे दूरदृष्टी नेते आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अनेक गड, बालेकिल्ले जिंकता येतात, मात्र कोणत्याही राजकीय योद्ध्याला आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकता येणे शक्य नसते हे देवेंद्र फडणवीस यांनी हा बालेकिल्ला जिंकून दाखवला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही नवी संकल्पना आणून राज्यात जलसिंचनाची चळवळ उभारून आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले आहे. असेही रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.